राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट, अजित पवारांच बंड शरद पवारांनी घडवून आणलं ?

0
43

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. स्वत: अजित पवार शिंदे सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणलं असावं, अशी चर्चाही काही प्रमाणात होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आधीपासूनच सहभागी असणारे आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. तसेच, आपल्याला जागा मिळण्याबाबतही सरकारला अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला आहे.
“एकंदरीत आजच्या स्थितीत असं वाटतं की ते अजित पवारांनाच करायचं होतं. मला सुरुवातीला वाटत होतं की शरद पवारांनीच हे बंड घडवून आणलं असेल. मी मारल्यासारखं करेन, तू मार खाल्ल्यासारखं कर वगैरे. पण तसं काही चित्र नाहीये”, असं ते म्हणाले.