संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आला. यावरूनही गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लबोल केलाय. ते म्हणाले की, कालचा धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता. मला तो मोर्चा वाटला नाही, तो शिमगा वाटत होता. मोर्चात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यात आल्या, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. तर एखादी आदरांजली सभा असेल तर अशा प्रकारच्या वर्तन असू शकते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आमदार म्हणून शपथ घेतलेले सुरेश धस यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात कलावंतांना अशा प्रकारे अपमानित करण्याचे धारिष्ट धसमध्ये कसे आले? विधानसभेच्या सभापतींनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाई करावी. प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा आहे. प्राजक्ता माळी, राश्मिका मंदाना, सपना चौधरी या सर्वांना माझा पाठिंबा आहे. कलावंतांना कोणी अपमानित करत असेल तर त्या लोकांना विरोध करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही कलावंतांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले.






