आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात केला. सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो शरद पवार यांना मान्य आहे का असा सवाल केला. त्यांनी साताऱ्यात बुथ कमिटीचा आढावा घेतला.