मुंबई- भाजप खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास उत्तरही दिले होते.
आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खा. विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. मविआत राष्ट्रवादी नवर्याच्या, शिवसेना बोलता येत नसलेल्या बायकोच्या भूमिकेत, तर काँग्रेस हे बिनबुलाये बाराती आहेत, अशी टीका सुजय विखे यांनी केली होती.
यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच मंत्री जयंत पाटील म्हणाले, नवरा, बायको, पाहुणे अशी बिरुदावली आमच्यातील सगळ्यांना देत आहेत. पण षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही.