Monday, May 20, 2024

अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे…मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडेच सर्व सूत्रे द्यावीत…

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शिरोळमधून आत्मक्लेश यात्रा काढण्यात आली आहे. ही आत्मक्लेश यात्रा कोल्हापूर सांगली या भागात जाणार आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी सरकारवर टीका केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी सल्लाही दिला आहे. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालतं. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.

ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles