औरंगाबाद: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.तसेच आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. हे अमर,अकबर,अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. मस्ती आल्यासारखी भाषा मलिकांना आली, ज्यांनी दाऊ ची प्रॉपर्टी घेतली त्याच्यासाठी राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. याचा अर्थ असा समजायचा का? की राष्ट्रवादी चा दाऊदच्या प्रकरणाला पाठिंबा आहे, असा सवालही त्यांनी केला आहे, तसेच आता बाळासाहेबांसारखी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेणं अपेक्षित आहे. बाळासाहेबांनी जनतेची बाजू घेतली होती, तीच अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून आहे, असेही ते म्हणालेत.
- Advertisement -