हिंदू पद्धतीतील लग्न असो किंवा मुस्लीम पद्धतीतील, कोणत्याही लग्नात वधूला मेहंदी लावली जाते. आपल्याकडे प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात तर मेहंदीला सोळा श्रुंगारांपैकी एक म्हटले आहे. लग्नाआधी वधू-वराच्या हातावर मेहंदी लावण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.
लग्नाच्या वेळी वधू-वराच्या मनामध्ये भीती आणि अस्वस्थता असते. हात आणि पायांवर मेंदी लावल्यास शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे वधू-वराची अस्वस्थताही कमी होते. या कारणास्तव, वधू आणि वराच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावली जाते.
तसेच, मेहंदीला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात, वधू-वराच्या हातावरील मेहंदीचा रंग जितका गडद असेल, त्यांच्यात तितकेच प्रेम असते. मेहंदीचा रंग जोपर्यंत टिकतो तोपर्यंत हे जोडप्यासाठी भाग्यवान मानले जाते. मेहंदी वधूच्या सौंदर्यातही भर घालते, त्यासोबतच ती अतिशय पवित्र मानली जाते.