मुंबई : दारु निर्मात्यांसाठी निर्णय घेणारे हे ठाकरे सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आता वीज कनेक्शन तोडले जात आहे, त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला आघाडी सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या अहंकार आम्ही तोडणार, असे फडणवीस यांनी सांगितले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महाज्योती संस्था, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी विषयांवरुन फडणवीसांनी ठाकरे सरकारवर पत्रकार परिषदेत हल्ला केला.