अहमदनगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत.
भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पीकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक स्वतः आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला.
बळीराजाच्या कुटुंबावर काळाचा घाला
भाजीचा पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
अपघातातील ओळख पटलेल्या पीकअपमधील मृतांची नावे
1) गणेश मस्करे वय.30 वर्ष (चालक मयत)
2) कोमल मस्करे वय.25 वर्ष (चालकाची पत्नी)
3) हर्षद मस्करे वय.4 वर्ष (चालकाचा मुलगा)
4) काव्या मास्करे वय .6 वर्ष (चालकाची मुलगी) सर्व रा. मड.तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
5) अमोल मुकुंदा ठोखे राहणार.जालना व
रिक्षातील मृतांची नावे
1) नरेश नामदेव दिवटे वय 66 वर्ष (रिक्षा चालक)रा. पेडे परशुराम तालुका चिपळूण जि.रत्नागिरी
इतर दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.






