राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता.यंदा एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली. दुसरीकडे 5 हजार 86 केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने बऱ्याच उपायोजना केल्या होत्या. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली होती. निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तारीख जाहीर होणार आहे. पुढच्या आठवड्यात बोर्डाचा निकाल जाहीर होणार. पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर केले जाणार. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिलीय.