मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुंबईत कोणाचीच विकेट काढायची गरज नाहीये. उद्धव ठाकरे यांची आधीच विकेट गेलीय. ते आधीच क्लीन बोल्ड झालेत.’ असा जोरदार प्रहार केला.मुंबईतील सहा पैकी सहा जागा महायुती जिंकेल. विजयाचा षटकार महायुती मारणार, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार विजयी होतील त्यामुळे मुंबईत कोणाची विकेट काढायची गरज नाही. उद्धव ठाकरे यांची विकेट गेलीये, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.