मला मोदींच्या नावावर तरी मतदान करा, मोदींसह विखे यांच्या नावाचा करिष्मा ओसरला; लंकेच्या उमेदवारीने विखेंवर पवाराभवाची नामुष्की
राहुरी :
देशात व राज्यात मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदारांची चांगलीच पंचायत होत असल्याचे चित्र दिसत आहे. नगर दक्षिणचे उमेदवार खासदार विखे मला मोदींच्या नावावर तरी मतदान करा असे म्हणून पराभवाची आलेली नामुष्की दाखवून देत आहे.आता सर्वसामान्य जनता ना मोदींना विखे म्हणत विकासात्मक कामे करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.ते राहुरी तालुक्यातील उंबरे येथे शनिवार 4 मे रोजी आयोजित सभेमध्ये बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राजूभाऊ शेटे, प्रकाश देठे, माणिकराव तारडे, भारत तारडे, एकनाथ हापसे, मोकाटे, राजेंद्र बानकर, बाळासाहेब आढाव, रंगनाथ मोकाटे, शब्बीर शेख आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुजय विखे यांचे जिल्ह्याची समस्या सोडविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे योगदान नाही. शेतकऱ्यांची, तरुण, बेरोजगारीसह महागाई यांसारखी कोणतीच समस्या सोडविली नाही. सत्ता उपभोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये माकडासारख्या उड्या मारण्याचे काम यांना चांगलीच जमते. त्यामुळे खासदारकी त्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्हे तर आपली मौज मज्जा करण्यासाठी पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस उमेदवारी ही लढवत आहे. कोविड काळामध्ये केलेले काम हे राज्यामध्ये नावलौकिक आहे. त्यामुळे तरुण तडफदार कर्तुत्ववान म्हणून निलेश लंके यांनाच संधी द्यावी असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.
पुढे बोलताना सरपंच प्रतिभा घोगरे म्हणाल्या की, विखे घराण्याचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपवायचे काम विखे कुटुंबिय करीत आहेत. तनपुरे सहकारी साखर कारखाना, गणेश सहकारी साखर कारखाना बंद पाडला. येथील सहकारी क्षेत्र विखे कुटुंबियांनीच मोडकळीस आणले आहे. परंतु यावेळी सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्याला त्याचा सत्तेचा माज उतरवा आणि प्रवरेचा पार्सल पुन्हा प्रवरेला पाठवा अशी घनाघाती टीका लोणीचे सरपंचांनी यावेळी केली आहे.
पुढे बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, आपल्या संस्था वाचविण्यासाठी सोईचे राजकारण करणा-यांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेतल्या. संपत्तीच्या जिवावर आपण काहीही करू शकतो असं त्यांना वाटत. दुसरीकडे माञ आपला साधा उमेद्वार असुन त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी थेट पंतप्रधान, मुख्यमंञी, उपमुखयमंञी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंञी यासह कॅबिनेट मंञी यांना यावे लागत यावरूच आपला त्यांनी किती धसका घेतला आहे. हे दिसून येत आहे. आणि आता माञ आपण ज्या मोदिंच्या नावाने मते मागत आहात. त्यांच्याबद्दल आपण काही दिवसांपुर्वी काय म्हणाले होते. अस म्हणत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी थेट खासदार सुजय विखे पाटील यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लीप ऐकवली. त्यात विखे असे बोलले होते की, धर्माच्या नावावर ,जातीच्या नावावर राजकारणात विष पेरण्याचे काम भाजपाने केले आहे. मोदी सरकार हे धर्माच्या नावावर मते मागत आहेत. गुजरात मधे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर खर्च करणा-या मोंदिवर टिका करत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न देखील या क्लीप मधे उपस्थित करण्यात आलेला आहे.