वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत शरद पवारांबाबत खळबळजनक दावा केला. चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांना फोन का केला याचा खुलासा झाला पाहिजे. हा फोनमध्ये राष्ट्रवादीच्या पाच जागांबाबत काही चर्चा झाली का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत ज्या तीन जागा लढवत आहेत त्यावर काही बोलणं झालं का किंवा उद्धव ठाकरेंबाबत काही बोलणं झालं काय याची माहिती शरद पवारांनी द्यायला हवी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.