IIT कानपूरच्या संशोधकांनी सांगितले की, ‘भारतात कोरोनाची चौथी लाट 22 जूनच्या आसपास सुरू होऊन 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहू शकते. कोविड-19 ची चौथी लाट आली तर ती किमान चार महिने टिकू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत लाट शिगेला पोहोचू शकते आणि त्यानंतर हळू हळू कमी होऊ शकते. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी देशात कोविड-19 लाटेचा अंदाज लावण्याची ही तिसरी वेळ आहे आणि तिसर्या लाटेबद्दलचा त्यांचा अंदाज अगदी काही अंशी खराही ठरला होता. यावेळी करोनाची चौथी लाट किती प्राणघातक असेल आणि त्याची तीव्रता किती असेल हे कोरोनाचा प्रकार आणि लसीकरणावर अवलंबून आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
करोना गेला! रूको जरा….’या’ महिन्यात येणार चौथी लाट…
- Advertisement -