Monday, May 20, 2024

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची शिष्टाई निष्फळ…छत्रपती संभाजीराजेंचा उपोषण सोडण्यास नकार

मागण्यांची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत छत्रपती संभाजीराजेंचा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार….

मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले. नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles