आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही गुंडाराज मुद्द्यावर मंत्री विखे पाटलांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्राजक्त तनपुरे म्हणाले, विखे पाटलांना गुंडांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या आजूबाजूला, कडेवर गुंडच असतात. राहुरी मतदारसंघाच्या माजी आमदारावर इतके गुन्हे आहेत की, ते तडीपार व्हायला पाहिजे. अहमदनगर शहरातले नावाजलेले गुंड यांच्याच मंचावर असतात. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात याचे आत्मपरिक्षण करा. अहमदनगर शहरात गुंड सर्वसामान्य लोकांच्या जमिनीचे ताबे घेत आहेत. तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा, तुमचं राज्य थोड्याच दिवसाचं आहे, असंही तनपुरेंनी म्हटलं आहे.
त्यांच्या आजूबाजूला, कडेवर गुंडच असतात…’गुंडाराज’ वरून तनपुरेंचे विखेंना प्रत्युत्तर!
- Advertisement -