काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उत्कर्षा रुपवते या शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यामुळे नाराज होत्या. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. मात्र, जागावाटपात शिर्डी ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा रुपवते नाराज झाल्या होत्या.
त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यामुळे आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उत्कर्षा रुपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.