आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘अर्थनासम मनस्तपं गृहे दुश्चरितानि च, वंचनम् चापमानम् च मतिमान प्रकाशयेत्’ या श्लोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येतो. तेव्हा या गोष्टीचा चर्चा कोणशीही करु नये.
* जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल, तर कोणाला सांगू नका. अपमानाचा घोट घेतल्यानंतर शांत व्हा.
* जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चारित्र्याबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका. ते स्वतःकडे ठेवा. याबाबत कोणाशी चर्चा केल्यास लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुमचे जगणे अवघड होऊन बसेल.
* तुमचे मन दु:खी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये. लोक तुमचे दु:ख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात, नंतर ते तुमची चेष्टा करतात. कोणीही तुमचे दु:ख समजू शकत नाही.
* पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोकही मदत करण्यास टाळाटाळ करतील