पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. आज (गुरुवार, १८ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या, ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान द्या. मी लोकसभेवरून गेल्यावर आपल्या मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत.