Thursday, May 2, 2024

वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आ.‌रोहित पवार यांनी केली नुकसान भरपाईची मागणी

कर्जत तालुक्यात चांदे बु, रवळगाव, वालवड, बारडगाव सु, होलेवाडी – चिलवडी, पाटेवाडी, कुळधरण, राक्षसवाडी बु, धालवडी, बेलवंडी आणि हिंगणगाव या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालंय. रवळगाव येथे विजेचे खांब पडले असून पाटेवाडी येथे घराचे पत्रे उडून गेले आहेत. तसंच केळी, फळबागा, भाजीपाला व चारा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. तसंच जामखेड तालुक्यात वीज पडून काही जनावरंही दगावली आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी. तसंच गेल्या महिन्यात ३० मार्च रोजी जामखेड तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.‌

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles