इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील आरक्षणाची मर्यादा 50 टक्के काढून टाकू, अशी महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. या सभेत राहुल गांधी यांनी राज्यात अत्यंत संवेदनशील झालेल्या मराठा आरक्षणाला हात घातला. दरम्यान, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलल्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.https://x.com/vnpatilofficial/status/1786611492256882999