भाजपाचा 400 पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. देशामध्ये लोकसभेच्या जागा 544 आहे, जर त्यांनी त्या सर्व येणार असे म्हणले असते तर आपण मान्य केले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे भाजपला लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 50 टक्क्याहून अधिक जागा या निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने चारशे पाच चा नारा पंतप्रधानांनी दिला आहे, याबाबत विचारल्यानंतर शरद पवार यांनी हा नारा मला चुकीचा वाटतो देशांमध्ये लोकसभेच्या 544 जागा आहेत त्यांनी त्या सर्व जिंकणार असे म्हटले असते तर ते एक वेळा मान्य केले असते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवीत आहेत अजून निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. महाविकास आघाडीला राज्यांमध्ये अनुकूल असे वातावरण असल्याचे शरद पवार यांनी सांगून या अगोदर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार काँग्रेसला एक व एमआयएमला एक अशा विरोधकांना जागा होत्या. यावेळी मात्र तसेच चित्र राहणार नाही, 50 टक्के जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा दावा ही शरद पवार यांनी केला आहे.