Friday, May 17, 2024

फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला खुलासा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक (१०५) जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर आहे. लोकांना असं वाटतं की इतका मोठा नेता (देवेंद्र फडणवीस) एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्रीपदावर बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलंय.” नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केलं

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles