भारतीय हवामान विभागाने कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या अवकाळीनं थैमान मांडल्याचं दिसत आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज देखील राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणेसह कोकणातील तापमानाचा पारा वर चढत चालला आहे. त्यामुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
विदर्भात तुरळक ठिकाणी आज गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात तापमान वाढल्याने चांगलाच उकाडा जाणवत आहे. यातच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/3KnfA9cwQQ— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 24, 2024