वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी मोदींवर टीका करतानाच मुख्यमंत्री एकनात शिंदेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदेंचं काम आता संपलं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली या ठिकाणी डॉ. बी. डी. चव्हाण यांची प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम संपलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणारही नाहीत. एकनाथ शिंदेंचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर वेगळं चित्र दिसू शकतं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.